दोनदा चॅम्पियन राहिलेला वेस्ट इंडिज संघ वर्ल्ड कपमधून बाहेर; पाहा नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 09:29 AM • 21 Oct 2022

T20 विश्वचषक 2022 च्या मोसमात मोठा उलटफेर झाला आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला आहे. आज (21 ऑक्टोबर) वेस्ट इंडिजचा आयर्लंडविरुद्ध करो किंवा मरोचा सामना झाला, ज्यात त्यांना 9 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. T20 विश्वचषकाच्या इतिहासात दोनदा विजेतेपद पटकावणारा विंडीज हा एकमेव संघ आहे. वेस्ट इंडिज संघाची यावेळी अत्यंत […]

Mumbaitak
follow google news

T20 विश्वचषक 2022 च्या मोसमात मोठा उलटफेर झाला आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला आहे. आज (21 ऑक्टोबर) वेस्ट इंडिजचा आयर्लंडविरुद्ध करो किंवा मरोचा सामना झाला, ज्यात त्यांना 9 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. T20 विश्वचषकाच्या इतिहासात दोनदा विजेतेपद पटकावणारा विंडीज हा एकमेव संघ आहे. वेस्ट इंडिज संघाची यावेळी अत्यंत खराब कामगिरी झाली आहे. या मोसमात हा कॅरेबियन संघ दुसऱ्यांदा उलटफेरचा शिकार झाला आहे. सर्वप्रथम, वेस्ट इंडिजला त्यांच्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडकडून 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हे वाचलं का?

T20 World Cup मधील वेस्ट इंडिजचा प्रवास संपला

विंडीज संघाने दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव करत दमदार पुनरागमन केले. अशा स्थितीत आयर्लंडविरुद्धचा तिसरा सामना विंडीजसाठी करो किंवा मरो असा होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्यांनी सुपर-12 गाठण्याची संधीही गमावली आणि हा सामना 9 विकेटने गमावला. T20 विश्वचषकाच्या चालू हंगामातील वेस्ट इंडिजचा प्रवास इथेच संपला आहे.

ब्रेंडन किंग वगळता एकही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही

या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो चुकीचा ठरला. संघाने केवळ 27 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. येथून ब्रेंडन किंगने 48 चेंडूत 62 धावांची खेळी करत संघाचा ताबा घेतला. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावाच करू शकला.

लेगस्पिन अष्टपैलू गॅरेथ डेलेनीने आयर्लंडसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना आपला शिकार बनवला. गॅरेथने 4 षटकांत 16 धावा देत तीन बळी घेतले. त्याने कॅप्टन पूरन, रोव्हमन पॉवेल आणि एविन लुईस या खतरनाक खेळाडूंची विकेट घेतली.

स्टर्लिंग आणि टकर यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आयर्लंडचा विजय

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने धमाकेदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच ती विंडीजवर जड होती. कोणताही कॅरेबियन गोलंदाज आयर्लंड संघावर दडपण आणू शकला नाही. आयरिश कर्णधार अँडी बालबर्नी 23 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला. पॉल स्टर्लिंग 48 चेंडूत 66 आणि लॉर्कन टकर 35 चेंडूत 45 धावा करून नाबाद राहिले. दोघांनी 17.3 षटकांत आयर्लंड संघाला सामना जिंकून दिला.

वेस्ट इंडिजने T20 विश्वचषकाचे विजेतेपद कधी जिंकले?

2012, चौथा हंगाम

T20 विश्वचषकाचा हा चौथा हंगाम श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता. त्यात वेस्ट इंडिज जिंकला. या कॅरेबियन संघाने कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा 36 धावांनी पराभव केला.

2016, सहावा सीझन

T20 वर्ल्ड कपचा हा मोसम भारतात आयोजित करण्यात आला होता. अशा स्थितीत भारतीय संघ विजेतेपद मिळवू शकेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला.

    follow whatsapp