Sam Pitroda : काँग्रेसची पित्रोदांमुळे पंचाईत! शाह संतापले; म्हणाले, "काँग्रेसचे पितळ उघडे पडलेय"

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाह यांची सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून काँग्रेसवर टीका.
अमित शाह आणि सॅम पित्रोदा.
social share
google news

Amit Shah On Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता अमित शाह यांनी संताप व्यक्त केला असून, पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे, असे ते म्हणाले. (Congress leader Sam Pitroda's statement has sparked a political storm. )

काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात आता सॅम पित्रोदा यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले, 'जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा संपूर्ण काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅकफूटवर आली. मला विश्वास आहे की काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल.'

अमित शा पुढे म्हणाले, 'आज सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे हेतू देशासमोर आला आहे. आधी त्यांच्या जाहीरनाम्यात 'सर्वेक्षणा'चा उल्लेख, मनमोहन सिंग यांचे जुने विधान जे काँग्रेसचा वारसा आहे. देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे आणि आता संपत्तीच्या वाटपावर अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा यांची टिप्पणी यावर चर्चा व्हायला हवी.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसला मालमत्ता सरकारी तिजोरीत टाकायचीये

अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा म्हणाले की, 55 टक्के संपत्ती सरकारी तिजोरीत जाते. आज सॅम यांनी काँग्रेसचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना लोकांची वैयक्तिक संपत्ती सरकारी तिजोरीत टाकायची आहे आणि ती अल्पसंख्याकांना वाटायची आहे.

हेही वाचा >> भर पावसात ठाकरेंची सभा.. मोदींवर हल्लाबोल, भाषण जसंच्या तसं! 

शाह म्हणाले की, 'त्यांना देशातील जनतेच्या वैयक्तिक मालमत्तेचे सर्वेक्षण करायचे आहे. सरकारी संपत्ती टाकायचे आहे आणि यूपीए सरकारच्या काळात झालेल्या निर्णयानुसार त्याचे वितरण करायचे आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून ते मागे घ्यावे किंवा हा त्यांचा हेतू आहे हे मान्य करावे... सॅम पित्रोदा यांचे विधान लोकांनी गांभीर्याने घ्यावे असे मला वाटते. त्यांचा हेतू आता समोर आला आहे, लोकांनी त्याची दखल घ्यावी..."

ADVERTISEMENT

सॅम पित्रोदा काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नुकतेच एका वक्तव्यात म्हटले होते की, निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर सर्वेक्षण केले जाईल आणि कोणाकडे किती संपत्ती आहे हे शोधले जाईल. 

ADVERTISEMENT

सॅम पित्रोदा यांना याबद्दल विचारले असता त्यांनी अमेरिकेत वारसा कर आकारला जात असल्याचे सांगितले. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल. त्यांच्या मृत्यूनंतर, 45 टक्के मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली जाते, तर 55 टक्के मालमत्ता सरकारच्या मालकी बनते.

हेही वाचा >> "मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर...", प्रियांका गांधींचा वार

ते म्हणाले की, 'हा एक अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर संपत्ती निर्माण केली आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही तुमची संपत्ती लोकांसाठी सोडली पाहिजे, अशी तरतूद आहे.'

'संपूर्ण मालमत्ता नाही तर अर्धी, जी मला योग्य वाटते. पण भारतात तसा कायदा नाही. जर येथे कोणाची 10 अब्ज रुपयांची संपत्ती असेल. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांना त्याची सर्व मालमत्ता मिळते, लोकांसाठी काहीही उरत नाही. मला वाटते की लोकांनी अशा विषयांवर चर्चा केली पाहिजे. या चर्चेतून काय निष्पन्न होईल माहीत नाही.'

हेही वाचा >> हेमंत गोडसेंची पुन्हा वाढली चिंता; महायुतीत 'नाशिक'वरून नवा ट्विस्ट!

'आम्ही नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत आहोत, जे केवळ श्रीमंतांच्या हिताचे नसून लोकांच्या हिताचे असले पाहिजेत.' 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT