Sumitra Mahajan : "लोक फोन करून सांगताहेत की, भाजपला नाही 'नोटा'ला मत देणार"

मुंबई तक

ADVERTISEMENT

अक्षय कांती बम यांच्या उमेदवारीवरून सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन.
social share
google news

Sumitra Mahajan on Indore Lok Sabha : इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात आता पक्षाचा उमदेवार नाही. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. दरम्यान, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या राजकीय घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना मोठं विधान केले आहे. त्यामुळे भाजपबद्दल नाराजी असल्याचे समोर आलं आहे. (Sumitra Mahajan said that people are saying that they will vote for NOTA and not to BJP)

काँग्रेसने अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली होती. पण, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमदेवारी मागे घेतली. यावरून भाजपवर टीका होत आहे. याबद्दल लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

सुमित्रा महाजन नेमकं काय बोलल्या?

'एमपी Tak'ला सुमित्रा महाजन यांनी मुलाखत दिली. इंदूरमध्ये भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा अंदाज होता. पण, जो घटनाक्रम घडला... त्यावर राहुल गांधीही असे म्हणाले की, ताईंच्या शहरात हे घडलं. यावर तुम्ही काय विचार करता? असा प्रश्न विचारण्यात आला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्याला उत्तर देताना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, "खरंतर मी सुद्धा विचारात पडले की, हे का झाले आणि कसे झाले? हे माझ्याही समजण्या पलिकडे आहे. पहिली गोष्ट अशी की, मी संघटनेच्या कोणत्याही समितीमध्ये नाहीये. मी निवृत्त झालीये, पण काम करते. पण, कोणत्याही पदावर नाही."

हेही वाचा >> 'मला शिवसेनेला दगाफटका करायचा नव्हता.. ओरबाडायचं नव्हतं', राज ठाकरेंचा नेमका रोख कोणाकडे?

"कार्यालयात बोलावल्यानंतर जात असते. हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. का केले, हे मला समजत नाहीये. याची गरज नव्हती. आम्ही जिंकत होतो. हा उमेदवार मला ताकदवानही वाटला नाही. आणि असला तरी भाजपने काँग्रेसच्या तगड्या उमेदवारांना हरवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची क्षमता, जी मला माहिती आहे... कार्यकर्त्यांची काम करण्याची क्षमता आणि इंदूरच्या लोकांचा कल, हा शंभर टक्के भाजपकडे आहे", असे त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला 

"आमचा जो विद्यमान खासदार आहे, त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण बिलकूल नाही. मोदीजींचं नेतृत्व या दोन्ही गोष्टींच्या बळावर आम्ही चांगल्या मताधिक्याने जिंकणार होतो. आता गोष्ट अशी हे का केले, काय केले? मी यावर काही बोलू शकत नाही", असे उत्तर त्यांनी दिले. 

ADVERTISEMENT

'भाजपला नाही, नोटाला मत देणार'

याचं मुद्द्यावर सुमित्रा महाजन पुढे म्हणाल्या की, "अनेक चांगल्या लोकांचे मला फोन येताहेत. मला त्यांना समजावून सांगावं लागत आहेत. ते म्हणताहेत की, भाजपची ही गोष्ट आम्हाला आवडली नाही. आम्ही भाजपला मतदान करणार नाही, 'नोटा'ला मतदान देणार."

"मी त्यांना म्हणाले की, हे चांगलं नाहीये. भाजपला यासाठी देणं गरजेचं आहे, कारण आम्ही जो उमेदवार दिला आहे, तो लढतोय. कमळ निवडणुकीत आहे. मोदीजींचं नेतृत्व तसंच आहे. तुम्ही असा विचार का करता? असा विचार करू नका. भाजपचा उमेदवार बदलला नाहीये, आमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे तुम्ही राग करायला नको, असे सांगून मी प्रयत्न करत आहे", असे त्या म्हणाल्या. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT