Chhagan Bhujbal : आव्हाड भुजबळांना म्हणाले, "तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाड छगन भुजबळांना काय बोलले?
जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळांच्या आरोपांना उत्तर दिले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केले गंभीर आरोप

point

भुजबळांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी दिले प्रत्युत्तर

point

महायुती सरकारच्या भूमिकेवर तिखट शब्दात टीका

Chhagan Bhujbal Jitendra Awhad : "पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चालले आहेत", असे म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. भुजबळांनी केलेल्या आरोपांवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलं. तसेच भुजबळांनाही खडेबोल सुनावले. (MLA Jitendra Awad responded to Cabinet Minister Chhagan Bhujbal's allegations against Sharad Pawar)

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी शिंदे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. 

छगन भुजबळांना जितेंद्र आव्हाडांनी काय दिले उत्तर?

जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, "भुजबळसाहेब तुम्ही आदरणीय पवारसाहेबांबाबत केलेले वक्तव्य आम्ही सर्वांनीच ऐकले.  गेली दोन वर्षे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंना केवळ खेळवत आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ

"आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठका घ्यायच्या मात्र अंतिम तोडगा काहीच काढायचा नाही, चर्चांमधे सर्वांना गुंतवून ठेवून या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवायचे, हिच या सरकारची रणनीती आहे. परवाची आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक हा देखील सरकारचा त्यापैकीच एक प्रकार होता", असा गंभीर आरोप करत आव्हाडांनी महायुती सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली. 

तुम्हाला विरोधी पक्षाची काही गरजच वाटत नाही -जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांनी पुढे म्हटले आहे की, "सरकारने आरक्षणाच्या विषयावर उचललेल्या कोणत्याही पावलांना विरोधीपक्षाने कायमच साथ दिली आहे. यापूर्वी सरकारने दोन्ही बाजूंशी चर्चा करताना विरोधी पक्षांना कधीही विश्वासात घेतले नाही. जे आम्हाला अपेक्षित होते. त्यामुळेच आम्हाला असे वाटले की, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण, तुम्हाला विरोधी पक्षांची काही गरजच वाटत नाही", असे खडेबोल आव्हाडांनी भुजबळांना सुनावले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?

"खरंतर परंपरेनुसार विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकत्र बसून या घडामोडींमध्ये सहभागी व्हायला हवे होते. पण, सरकारने गेल्या दोन वर्षात विरोधी पक्षाला मोजलेच नाही. किंबहुना विरोधी पक्षांची ताकदच नाही असे आपल्याला व आपल्या सरकारला वाटत होते", अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. 

ADVERTISEMENT

भुजबळसाहेब, तुम्ही मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला असता, तर...; आव्हाड नक्की काय बोलले?

"भुजबळ साहेब आपणही बाहेर जेवढे विरोधात बोलता; तेवढेच कॅबिनेटमध्ये बोलले असते अन् कॅबिनेट ला निर्णय घ्यायला लावला असता ती आपल्यात क्षमता आहे किंवा मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर लोकांच्या प्रश्नावर लढणारा नेता म्हणून म्हणून आपली ख्याती आहे ती अजुन वृंधिंगत झाली असती", असा टोला जितेंद्र आव्हाडांनी भुजबळांना लगावला.

"फक्त दोन समाजात तेढ निर्माण होईल, याची हे सरकार व्यवस्था करीत असते.लोकसभेला बसलेल्या फटक्या मुळे आपले सरकार अस्वस्थ आहे आणि उभ्या महाराष्ट्रला ते दिसते आहे", अशा शब्दात आव्हाडांनी भुजबळांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT