Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या
Narayan Rane Uday Samant : राणे आणि सामंत यांच्यातील राजकीय संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाढला आहे.
ADVERTISEMENT
![Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर राणे-सामंत संघर्षाला तोंड फुटले आहे.](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/mbtak/images/story/202406/666e93c28d245-narayan-rane-uday-samant-mahayuti-162657624-16x9.jpg?size=948:533)
Maharashtra Politics Rane Samant : (गोकुळ कांबळे, रत्नागिरी) लोकसभा निवडणुकीआधी राणे आणि सामंत यांच्या समेट घडवून आणला गेला. पण, निकाल लागताच राणे विरुद्ध सामंत या राजकीय संघर्षाने डोकं वर काढलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालानंतर भाजपचे राणे आणि शिवसेनेचे सामंत यांच्या बॅनर'वार' सुरू झाला आहे. (The political dispute between Narayan Rane and Uday Samant has started again)
कोकणात पुन्हा एकदा राणे-सामंत संघर्ष उफाळून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाले. पण, ज्या विधानसभा मतदारसंघाचे उदय सामंत आमदार आहेत, तिथे राणे यांना मताधिक्यच मिळाले नाही. रत्नागिरी, चिपळून आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले.
हेही वाचा >> ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर
हेच कारण ठरलं आहे राणे-सामंत संघर्षाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राणे विरुद्ध सामंत बॅनर'वार' कसं सुरू झालं?
नारायण राणे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेकडून अभिनंदनाचा बॅनर शिवाजी चौकात लावण्यात आला होता. या बॅनरवरील किरण सामंत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा फोटो अज्ञाताकडून फाडण्यात आला.
हेही वाचा >> 'मोदींच्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले तर...'; केंद्रातल्या मंत्रिपदावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या!
या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजेच 14 जून रोजी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयासमोर उदय सामंत, किरण सामंत यांच्या फोटोसह एक बॅनर लावण्यात आला. त्यावर 'वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे', असा मजकूर छापण्यात आला.
ADVERTISEMENT
![Banners put up by supporters of Uday Samant, Kiran Samant against Narayan Rane](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/styles/medium_crop_simple/public/images/story/202406/screenshot_2024-06-16_115807.png)
राणे समर्थकांकडून प्रत्युत्तर
सामंतांच्या बॅनरला राणे समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. नितेश राणे कार्यकर्त्यांसह विजयाचा आनंद साजरा करतानाचा एक फोटो असलेला बॅनर लावण्यात आला. त्यावर 'हमारा वक्त आया है... तुम्हारा वक्त आने भी नही देंगे', असा इशारा दिला गेला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> नारायण राणे थेट म्हणाले, 'कोकणातून मी शिवसेना संपवली'
![nitesh Rane supporters put up banner against samant brothers](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/styles/medium_crop_simple/public/images/story/202406/screenshot_2024-06-16_115736.png)
इतकंच नाही, तर आणि एक बॅनर नारायण राणे यांचाही लागला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत. "बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है", अशा आशयाचे बॅनर लागले आहेत.
![Banner put up by BJP workers who are supporting Narayan Rane](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/styles/medium_crop_simple/public/images/story/202406/screenshot_2024-06-16_115607.png)
कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीत आता पहायला मिळत आहेत. यामुळे तळकोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT