Vidhan Parishad Election: दोन वर्षांपूर्वी 'याच' निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, आज पुन्हा...

मुंबई तक

ADVERTISEMENT

दोन वर्षांपूर्वी याच विधानपरिषद निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप,
दोन वर्षांपूर्वी याच विधानपरिषद निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन वर्षापूर्वी विधानपरिषद निवडणुकीनंतर घडलेला मोठा उलटफेर

point

विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेला सत्तापालट

point

यंदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित कसं असणार?

Vidhan Parishad Election and Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असेच चित्र दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळच्या एका राजकीय घटनेने केवळ सरकारचेच नव्हे तर शिवसेनेचेही भवितव्य बदललं. (vidhan parishad election 2024 the political earthquake that occurred in maharashtra two years ago with the same vidhan parishad election what will happen today)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज म्हणजेच 12 जुलै रोजी मतदान पार पडलं. आमदारांची एकजूट राखण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सपासून डिनर डिप्लोमसीपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडी यांनी आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काय घडलं होतं?

दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी 20 जून 2022 रोजी मतदान झालं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते. तर भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केले होते.  उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी 287 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 26 सदस्यांची मते आवश्यक होती. म्हणजेच त्यावेळी कोटा हा 26 चा होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावेळी मविआचे संख्याबळ हे 151 आमदार होते. ज्यामध्ये शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 52 आमदार होते. सहाव्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी युतीला पाच आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. तर भाजपचे संख्याबळ 106 आमदार होते. पाचही उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 130 मतांची आवश्यकता होती आणि चार उमेदवारांचा विजय सुनिश्चित केल्यानंतर पक्षाकडे पाचव्या उमेदवारासाठी फक्त दोन मते शिल्लक होती. मात्र भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आणि पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने एकूण 134 मते मिळाली होती.

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदेंनी केलेलं शिवसेनेत बंड

विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मंत्री एकनाथ शिंदे हे अचानक नॉटरिचेबल झाले होते. निवडणुकीचे निकाल संध्याकाळी उशिरा आले आणि त्याच सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह गुजरातमधील सुरतला पोहोचल्याची बातमी समोर आली होती. 

ADVERTISEMENT

ही बातमी समोर येताच उद्धव ठाकरेंपासून शिवसेना आणि MVA नेते हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आले होते. यावेळी ठाकरेंकडून शिंदे यांचं मन वळविण्याचा बराच प्रयत्न झाला होता. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नव्हतं. त्यानंतर एकामागून एक आमदार हे एकनाथ शिंदेंकडे जाऊ लागले. सुरुवातीला सुरतमध्ये असणाऱ्या या सर्व आमदारांना आसाममधील गुवाहाटी येथे नेण्यात आलं. जिथे शिंदे गटातील आमदारांची संख्याही वाढत गेली. यावेळी काही अपक्ष आमदारांनी देखील ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे शिंदेंकडे 40 हून अधिक आमदारांचं संख्याबळ होतं. दरम्यान, या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार हे अल्पमतात आलं होतं. त्यामुळे अखेर उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रिपद सोडावं लागलेलं.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि नवीन सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार शिंदे हे त्यांच्यासोबत गेले. यानंतर निवडणूक आयोगापर्यंत चाललेल्या नाव आणि चिन्ह या लढाईतही शिंदेंनी बाजी मारली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सोडून नवा पक्ष काढावा लागला. 10 जागांच्या या विधानपरिषद निवडणुकीने केवळ महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेची आसनव्यवस्थाच बदलली नाही तर भविष्यातील राजकीय चित्रही पार बदलून गेलं.

यावेळी 11 जागांसाठी 12 उमेदवार आहेत.

बरोबर दोन वर्षांनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी महायुतीकडून नऊ आणि विरोधी पक्षाकडून तीन उमेदवार रिंगणात आहेत. एनडीएबाबत बोलायचे झाले तर भाजपने पाच, शिवसेना (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीबद्दल बोलायचे झाले तर शिवसेना (UBT) आणि काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.

विधानपरिषद निवडणुकीत नंबर गेम काय आहे?

महाराष्ट्र विधानसभेत सध्या 274 आमदार आहेत. 11 जागांसाठीच्या निवडणुकीत उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी 23 आमदारांची मते आवश्यक असतील. नऊ उमेदवार उभे करणाऱ्या सत्ताधारी आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, भाजपचे 103, राष्ट्रवादीचे (अजित पवार) 40 आणि शिवसेना (शिंदे) 38 आमदार आहेत. अपक्ष आणि इतर लहान पक्षांसह, युतीला 203 आमदारांचा पाठिंबा आहे, जो सर्व उमेदवारांच्या विजयाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या 207 पेक्षा चार कमी आहे.

जर आपण विरोधी MVA बद्दल विचार केला तर त्यांच्या तीन उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 69 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत, शिवसेनेकडे (यूबीटी) 16 आमदार आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत. दोन आमदार सपाचे, एक सीपीएम आणि एक पीडब्ल्यूपीआयचा आहे. MVA चे संख्याबळ 69 वर पोहोचते आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM च्या दोन आमदारांचा समावेश केल्यास महाराष्ट्र विधानसभेतील विरोधकांचे संख्याबळ 71 वर पोहोचते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT